Search This Blog

Saturday, July 5, 2025

 Rashmi Madankar






****************  

कुणीतरी हाक घालतं
 मनाच्या बांधावरच हात घालतं
बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात
आणि भीती दाटून येते

कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित
मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून
टाळे लावून घेतलेले असतात
आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात
अंतर आखले अंतर राखले असतात ..

मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत
पण अंतरं मन मोडतही नाहीत
मनांचा मनाशी संवाद घडत राहायला
हरकत नाही एकवेळ ..
पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना
मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..

No comments:

المنتدى الدولي للإبداع والإنسانية المملكة المغربية

Autor :Maria Zanatta  Pais: Estados Unidos  ¿Que sería de la vida sin  poesía ? Que seria del mundo sin la poesia....y la voz de un poeta .....